जिल्ह्यात सहा मृत्युसह 382 जण पॉझेटिव्ह  222 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 11 : गत 24 तासात जिल्ह्यात सहा मृत्युसह 382 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 222 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 84 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 83 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 68 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 62 वर्षीय महिला आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 382 जणांमध्ये 229 पुरुष आणि 153 महिला आहेत. यात पुसद येथील 106, यवतमाळातील 84, दिग्रस 54, बाभूळगाव 32, महागाव 27, दारव्हा 26, नेर 11, पांढरकवडा 10, कळंब 9, उमरखेड़ 9, वणी 5, राळेगाव 4, आर्णि 3, मारेगाव 1 आणि झरीतील 1 रुग्ण आहेत.
गुरुवारी एकूण 1791 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 382 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1409 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2226 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 20554 झाली आहे. 24 तासात 222 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17833 आहे. तर जिल्ह्यात एकूण 495 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 178619 नमुने पाठविले असून यापैकी 176983 प्राप्त तर 1636 अप्राप्त आहेत. तसेच 156429 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *